रविवारी पाकिस्तान विरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने तुफानी खेळी करत सर्वांना आपल्या वापसीचे संकेत दिले आहेत. तेव्हापासून कोहलीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचे एक वक्तव्य समोर आले असून, तो म्हणाला विराट कोहलीने टी-20 मधून निवृत्ती घ्यावी, कारण त्याने आपली सर्व शक्ती टी-20 क्रिकेटमध्ये लावावी, असे मला वाटत नाही.
या फॉर्ममुळे कोहली वनडेत त्रिशतक ठोकू शकतो. विराटसाठी पुनरागमन करण्यासाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म होता. शोएब अख्तरने पाकिस्तान संघाचे कौतुक करत पाकिस्तानने चमकदार कामगिरी केल्याचे सांगितले. निराश होऊ नका, तुम्ही सर्वजण खूप चांगले खेळलात. टीम इंडियानेही चांगली कामगिरी केली. त्यांनी इतिहासातील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक जिंकला. हा संपूर्ण विश्वचषक सामना होता. त्यात कॅच, रन आऊट, नो-बॉल, स्टंपिंग सर्वकाही होते. विश्वचषक अजून संपलेला नाही. टीम इंडिया आणि पाकिस्तान पुन्हा भेटणार आहेतच.
त्यानंतर अख्तरने संध्याकाळचा स्टार विराट कोहलीची 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्याबद्दल त्याचे कौतुक केले. कोहली फॉर्ममध्ये नसतानाही अख्तरने नेहमीच कोहलीला पाठिंबा दिला आहे.
त्याने कोहलीची खेळी आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, ‘ अपयशातूनच पुढे विजय मिळतो आणि विजयातूनच विश्वास प्राप्त होतो, त्याचे नाव आहे विराट कोहली. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर त्याच्या खेळीनंतर म्हणाला, ‘विराट कोहली, निःसंशयपणे ही तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी होती. तुला खेळताना पाहून आनंद झाला. 19व्या षटकात राउफच्या चेंडूवर लाँग ऑनवर मारलेला षटकार शानदार होता. असेच खेळत राहा.’