हरारे
भारतीय संघाने झिम्बाब्वे दौर्यावर विजय मिळवला आहे. कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली संघाने तिसरा सामना 13 धावांनी जिंकत मालिका आपल्या नावावर केली आहे. भारतीय संघातील फलंदाज शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या उत्कृष्ट खेळीने केली. फलंदाजांची उत्कृष्ट खेळी आणि गोलंदाजांच्या मार्याने झिम्बाब्वेविरुद्ध यश मिळवले. या विजयासोबत्च भारताने पाकिस्तानच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी
भारताने झिम्बाब्वे विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत अपेक्षित असे धवलयश प्राप्त केले. यासह भारतीय संघाने पाकिस्तानच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 54 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध 62 सामने खेळले असून 54 सामने जिंकले आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत भारत आता पाकिस्तानच्या बरोबरीने उभा आहे.
भारतीय वेगवान गोलंदाजांनी तिन्ही सामन्यांमध्ये शानदार खेळ दाखवला. सिकंदर रझाच्या जोरावर झिम्बाब्वे संघ सहज जिंकेल असे काही वेळासाठी वाटत होते, पण त्यानंतर शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर शुभमन गिलने शानदार झेल घेतला, त्यामुळे रझा बाद झाला.
शार्दुलने मोक्याच्या वेळी विकेट घेत विजय भारताकडे वळवला. भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. आवेश खानने सर्वाधिक 3 बळी घेतले. दीपक चहर, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स त्यांच्या खात्यात जमा केल्या.
ईशान-गिलच्या जोडीने केली कमाल
तिसर्या वन डे सामन्यात कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि केएल राहुल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण राहुलला मोठी खेळी खेळता आली नाही. तर धवनने 40 धावा केल्या. यानंतर ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी मिळून मोठी भागीदारी केली. ईशान किशनने 50 धावा केल्या. तर शुभमन गिलने 130 धावांची तुफानी इनिंग खेळली. या खेळाडूंच्या जोरावरच भारतीय संघ विजय मिळवू शकला.