प प्रतिनिधी, नवी दिल्ली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून महाराष्ट्रातील 3 बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. जाणूनं घ्या कोणत्या बँका आहेत, ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया () तीन बँकांवर नियमांचं पालन न केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील 3 बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, द यवतमाळ को-ऑपरेटिव्ह बँक लि., वरुड को-ऑपरेटिव्ह बँक लि. या तीन बँकावर दंडात्मक कारवाई आहे.
आरबीआयनं अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 7 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर केवायसीप्रकरणी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 3.50 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेनं आरबीआयनं सहकारी बँकांना जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि केवायसीप्रकरणी 1 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. बँकांकडून नियमांचे पालन न केल्यास रिझर्व्ह बँक दंड आकारत असते. या कारवाईचा बँकेच्या ग्राहकांवरही परिणाम होत असतो.