अंबरनाथ/प्रतिनिधी :-
अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील गावांना व पाड्याना गावठाणचा दर्जा मिळण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी तहसीलदार व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आज मंगळवारी आढावा बैठक घेतली.
अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील जांभिवली ठाकुरपाडा, फणसीपाडा, चिखलोली ठाकूरवाडी, कानसई गाव पूर्व, खुंटवली पाडा, हाल्याचा पाडा, वांद्रापाडा, मोरीवली पाडा, अंबरनाथ पाडा, अंबरनाथ जुने गाव व पालेगाव या गावांना तसेच पाड्यांना गावठाणचा दर्जा मिळण्याच्या अनुषंगाने या आकृतिबंधनुसार नगरभूमापनाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना भूमीअभिलेख विभागाच्या उप अधिक्षक श्रीमती मीना पांढरे यांना दिल्या.
या गावांना व पाड्यांना गावठाणाचा दर्जा मिळाल्यास येथील नागरिकांना नगरपरिषदे मार्फत सर्व सोयी – सुविधा उपलब्ध होऊ शकतील. याकरीता आमदार डॉ. बालाजी किणीकर हे शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत असून त्याच अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याबैठकीला माजी नगराध्यक्ष विजय पवार, सुनिल चौधरी, उपशहरप्रमुख संदीप मांजरेकर, गणेश कोतेकर, संजय सावंत, जेष्ठ माजी नगरसेवक नंदकुमार भागवत, माजी नगरसेवक सुनिल सोनी, सुभाष साळुंखे, विभागप्रमुख शिवाजी गायकवाड, शाखा प्रमुख सुरेश कदम, उद्योग सेनेचे सुनील खरे, तहसीलदार सौ.प्रशांती माने, अतिरिक्त मुख्याधिकारी धीरज चव्हाण, नायब तहसिलदार संभाजी शेलार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.